Tweet

Friday 3 March 2017

Safety of School Going Children

Safety of School Going Children:
शाळेत जाणाऱ्या मुलांची सुरक्षाः
School Children
सध्याच्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलांचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्व साधारणपणे कुटुंबात आई-वडिल-मुले एवढ्यांचाच समावेश असतो. आई-वडिल दोघेही अर्थर्जन करतात. त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यास दोघापैकी एकालाही वेळ नसतो. याचा परिणाम म्हणजे मुलांकरिता प्रथम पाळणाघर व नंतर बालविहार व तद् नंतर शाळा/विद्यालय/महाविद्यालय हे पर्याय वापरले जातात. या मुलांचे दोन गट करता येतील. पहिला वय वर्षे बारा किंवा कमी व दुसरा बारा वर्षांपेक्षा जास्त. पहिल्या गटातील मुले जास्त आज्ञाधारक असतात. तरीही त्यांचेवर जास्त विश्वास ठेवता येत नाही. कारण त्यांची कोठल्या परिस्थितीत कसे वागावे हे समजण्याची कुवत पूर्णपणे विकसित झालेली नसते. गोंधळामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त असते.
School Bus
अशी मुले स्वयंचलित दुचाकी वापरत नाहीत. शाळेत जाण्याकरिता सर्वसाधारणपणे स्कूल बसचाच उपयोग करतात. त्यांची सुरक्षा घरातून बाहेर स्कूलबस जेथे थांबते तेथे येणे, बसमध्ये चढणे, बसमधून प्रवास करणे, शाळेजवळ जेथे बस थांबते तेथे उतरणे व शेवटी वर्गात जाऊन बसणे एवढीच नाही तर शाळेत असेपर्यंत तसेच परत घरी परतेपर्यंत सुरक्षेची जबाबदारी शाळेने स्वीकारली पाहिजे. स्कूलबस थांबण्याची जागा ही महत्वाची आहे. बसमध्ये चढताना तसेच उतरताना मुलांना इतर वाहने व तत्सम गोष्टीपासून धोका असू शकतो. त्याकरिता या स्थानावर योग्य सोय असणे अपरिहार्य आहे. या करिता लागणाऱ्या सोई म्हणजे
Bus Stop on RoadSide 
गाडीला सुरक्षितपणे उभा करण्याकरिता जागा, मुलांना घरापासून ते
थपर्यंत येण्याकरिता सुरक्षित वाट तसेच गाडी मध्ये चढता उतरताना लागणारी सुरक्षा. अशाच सोई शाळेच्या आवारातही उपलब्ध असणे गरजेचे आहे. जर शाळेच्या आवारात जागा उपलब्ध नसेल तर मग अशी सोय शाळेलगतच्या सार्वजनिक रस्त्यावर करावी लागेल. त्याकरिता खर्च करावा लागेल तो शाळेने करावा. तो खर्च म्हणजे उड्डाण पूल बांधून रस्त्यावरील वाहतुक विना अडथळा चालू ठेवणे व त्या पुलाशेजारी गाड्या उभ्या करण्यास अशी व्यवस्था करणे की, गाड्यांना पुलाखाली शिरणे अशक्य असेल परंतु, गाडीमध्ये चढणारी तसेच उतरणारी मुले पुलाखालीच वावरतील. अशी सोय मुलांच्या वाहतुकीकरिता केल्यास मुलांचा सुरक्षेचा प्रश्न ७०% पेक्षा जास्त प्रमाणात सुटेल.
1.62 Lakh Accidents per Annum
१४-१५ वय झाले की, हल्ली मुलांना कमीत कमी स्वयंचलित दुचाकी वापरण्याची सवय लागते. हल्ली सायकल इतिहास जमा झालेली दिसते. ही परिस्थिती सुरक्षतेच्या मुद्यावरुत तरी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. हा रिपोर्ट DNA मध्ये प्रकाशित झाला आहे. भारतात दरवर्षी अशी मुले दीड लाखापेक्षा जास्त अपघात करतात. ते थांबविणे आवश्यक आहे. http://www.dnaindia.com/india/report-underage-drivers-and-those-without-licences-cause-162-lakh-accidents-across-country-2155569
हल्ली मुलांना वय वर्षे ५ झाले की बालवाडी किंवा तत्सम शाळातून प्राथमिक शाळेत प्रवेश दिला जातो. त्याचा अर्थ जर सर्वसाधारण परिस्थितीचा विचार केला तर सिनिअर महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचा विद्यार्थीही अज्ञान (म्हणजे वय वर्षे १८ पूर्ण न केलेला) असू शकतो. याचा अर्थ शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील स्वयंचलित दुचाकी चालवणारे जवळ जवळ १००% विद्यार्थी स्वयंचलित वाहने चालविण्यास सक्षम नाहित. या मुलांच्या स्वतःच्या तसेच रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षेकरिता स्वयंचलित दुचाकी चालवणारे धोकादायक आहेत. शासनाने ही धोकादायक परंपरा खंडित केलीच पाहिजे. त्याकरिता आर्थिक दंड आकारण्याऐवजी त्या विद्यार्थ्यांना पोलिस चौकीच्या चकरा मारण्यास लावावे. असे केले तरच विद्यार्थ्य़ांना शिस्त लागेल. आर्थिक दंडाचा परिणाम सर्वश्रृत आहे. जितका दंड जास्त तितकी गुन्ह्यातून सुटका करुन घेण्याची फी जास्त. त्यामुळे ही पळवाट वापरण्याची शक्यता जास्त.
Accident in USA
ही फक्त भारतातच नाही तर जगातील सर्व देशामधील समस्या आहे. .

No comments:

Popular Posts