Tweet

Topics

Showing posts with label पुणे. Show all posts
Showing posts with label पुणे. Show all posts

Thursday, 18 October 2012

Busday: पुण्यामध्ये 1 नोव्हेंबरला सकाळसमुहातर्फे साजरा होणार बसडे:


वाहतुककोंडी
सकाळसमूहाने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. सध्या पुण्यात लोकल ट्रेनची काही ठिकाणची व मर्यादीत वेळेतील सेवा सोडली तर रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय नाही. सार्वजनिक वाहतुक सक्षम नसल्यामुळे नागरिकांचा स्वतःच्या वाहनावरच विश्वास आहे. सकाळ समूहातर्फे एक दमदार पाऊल उचलले जात आहे ते सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याचे तसेच लोकांचा विश्वास निर्माण करण्याचे. बसस्थांब्यापासून घरी व कार्यालयात जाण्याकरिता ऑटो रिक्षा चालकांनी कंबर कसली आहे. त्याला नागरिक व निरनिराळ्या संस्था तसेच गट, एकजुटीने सहाय्य करत आहेत व सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.  जर 1 नोव्हेंबर 2012 चा प्रयोग यशस्वी झाला तर तो प्रयोग रोज राबविण्याकरिता दरवाजे उघडले जातील. नागरिक जर सार्वजनिक वाहुतक व्यवस्था वापरू लागले तर खाजगी वाहने रस्त्यावर उतरणार नाहित व रस्त्यावरील कोंडी पूर्णपणे संपली नाही  तर निदान कमी होईल. सध्याचे रस्ते पुरेसे वाटू लागतील.

Friday, 24 August 2012

पीएमआरडीईचे क्षेत्र वाढविणे आवश्यक!


श्री. रामचंद्र गोहाड, माजी संचालक, नगररचना विभाग, पुणे यानी वर्तमानपत्रात लेख लिहून पुण्याच्या विकासाबाबत 1952 पासूनपासून आजपर्यंत शासनाने काय काय केले व आता काय केले पाहिजे हे स्पष्ट केले आहे (पहा दै. सकाळ, प्रॉपर्टी पृष्ठ 4, 4 ऑगष्ट 2012). शासनाने वेळोवेळी बदल केले. परंतु सर्व बदल शासनाच्या नियमात बसणारेच. त्या मध्ये कोठलाही नवीन बदल केला नाही. मला एक गोष्ट आठवते.

Sunday, 6 May 2012

वाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन


Dangerous Road Crossing
भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे समजले जाते की, वाहतुकीचे नियम बनविले व ते मोडणारांना शिक्षा केली तर शिक्षेच्या भीतीने जनता नियम पाळेल. परंतु, हा एक गैरसमज आहे. सर्वसाधारणपणे असे दिसते की, लोकांची वृत्ती नियम पाळण्याची नसते. त्यांना वटते की, वर्ष-सहा महिन्यात एखाद्या वेळेला पकडले जाण्याची शक्यता असते. जर पकडले गेलो तर पोलिसाला 50 रुपयांची एक नोट दिली की, प्रकरण मिटते. अशा परिस्थितीत नियम कितीही कडक असले तरी त्यांचा परिणाम शून्य असतो. धर्मसंस्थापकानी यावर उत्तम उपाय शोधले व देव या संकल्पनेची निर्मिती केली.

Friday, 23 March 2012

पिंपरीचिंचवड शहराचा विकास आराखडा - 2020


Pimprichinchwad Corporation Main Building
पिंपरीचिंचवडशहर जरी विचारात घेतले असले तरी या लेखातील माहिती सर्वच शहरांना लागू पडते. शहरविकासाची जबाबदारी नगरनिकास खात्याची आहे. हे खाते कोण्याकाळी बनविलेली नियमपुस्तिका अजूनही वापरते. ज्या काळी पाणी, वीज, मलनिस्सराण, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगैरे सुविधाना फारसे महत्त्व नव्हते व फक्त चटईक्षेत्रच महत्त्वाचे होते त्या काळचे नियम वापरून बांधकामांना परवानगी दिली जाते. बांधकामे झाल्यावर सुविधांचा विचार होतो. त्याकरिता जागा उपलब्ध नसते. त्यामुळे जागा मिळविण्याकरिता खूप खर्च योतोच परंतु, बहुतेक वेळा जागाच उपलब्ध नसते. त्यामुळे सुविधाच पुरविल्या जात नाहित. राजकारणी लोक जनतेला मदत करण्याकरिता अव्वाच्या सव्वा मागण्या करतात.

Monday, 12 December 2011

महिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:

संबंधित लेख येथे वाचा.  हिंदी मे पढने के लिये नीचे स्क्रोल किजिये।  संबंधित लेख येथे
Toilet for Women
वाचा.
In order to read in English scroll down.

Toilets for Women
Result after Accident
कृपया या मेलची छापील प्रत महापौर, आयुक्त, नगरसेवक तसेच शहर अभियंता याना द्यावी तसेच त्यांचा ईमेलचा पत्ता कळवावा.

सन्माननीय महापौर, आयुक्त, शहर अभियंता तसेच नगरसेवक
प्रिय महोदय,
महिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:

Monday, 21 November 2011

पुण्यातील टेकड्यांवर बांधकामास शासनाने दिली परवानगीः


Save Hill
Save Hill
बीडीपीच्या अनुषंगाने टेकड्यांचा विकास करणे उत्तम. परंतु त्याकरिता लागणारा निधी ना महापालिकेकडे आहे ना राज्यशासन मदत करू शकते. तेथे झोपडपट्ट्या मात्र निर्माण होतील. त्यामुळे 4 टक्के बांधकामांना परनवानगी देऊन टेकड्या वाचवण्याचा उपाय उत्तम आहे.
-->तसेच 4 टक्क्कयाचा नियम कायम ठेवावा. पुढे कधीही त्यात वाढ करू नये. परंतु, पुर्वानुभव लक्षात घेता बांधकाम व्यवसायिक त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता 100 टक्के आहे. या व्यवसायिकांकडून टेकड्या वाचवावयाच्या असतील तर त्याकरिता परनवानगी बरोबर नियम बनवून त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. माझ्यामते खालील अटी आवश्यक आहेतः-

Saturday, 13 August 2011

पवनेचे पाणी पेटले:

River Water For Drinking
विकास झालाच पाहिजे. याबद्दल दुमत असू शकत नाही. परंतु, विकासाकरिता जमीन, पाणी, वीज, रस्ते वगैरेंची नितांत आवश्यकता आहे. ही आवश्यकता पुरी करण्याकरिता कोणाला ना कोणाला त्याग करावयास पाहिजे. बहुजन हित पाहता 2-4 जणानी त्याग केला व 2-4 हजारांना फायदा होत असेल तर त्या दोन-चार जणानी त्याग करणे इष्ट आहे. त्याच बरोबर 2-4 हजारांनी त्या 2-4 जणांची काळजी घेणे हेही ओघाने येतेच. 2-4 हजारांनी ही बांधिलकी लक्षात घेऊन जर वर्तन केले तर 2-4 जण नक्कीच त्याग करण्यास तयार होतील व त्याग करतीलच. भारतात हे नक्कीच शक्य आहे.

Wednesday, 3 August 2011

बससेवा तसेच बीआरटी:

Suggested Design: BusStop
Railway

Bus Transport
महानगरपालिकांची (किंवा कोठल्याही सार्वजनिक व्यवस्थेची) योग्य वेळी, पुरेशा प्रमाणांत दळणवळणांची साधने पुरविताना सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी आहे. असुरक्षित प्रवास साधने म्हणजे खून करणे आहे. बीआरटीलाही हा नियम लागू आहे. बसप्रवाशांना प्रथम बसथांब्यावर सुरक्षितपणेपोहचणे हा सगळ्यात पहिला टप्पा. महापौरांना लिहिलेले पत्र इथे पहा. बसप्रवाशी पदपथावर असेल असे गृहित धरू या. बसप्रवासातील पहिला टप्पा म्हणजे बसथाब्यावर पोहचणे. म्हणजेच बसथांबा पदपथावर नसेल तर तेथे जाण्याकरिता विना अडथळा वाट पाहिजे. रस्ता ओलांडून जाताना इतर वाहनांच्या खाली बसप्रवाशी येऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.

Saturday, 25 June 2011

मेट्रोमुळे अडचणी दूर होतील काय?


सध्या मिडियामध्ये आपीएल व शहरामध्ये मेट्रो यांची चर्चा रंगत आहे. जसे काही यापेक्षा मोठ्या अडचणी जनतेपुढे नाहीतच! राजकारणी पूर्ण माहिती नसतानासुद्धा मेट्रो बद्दल ठराव पास करतात व सामान्य नागरिकांना वाटते की मेट्रो प्रत्यक्षात आली, उद्या आम्ही मेट्रोने जाणार!

सार्वजनिक वाहतुक विश्वसनीय व सुरक्षित करावीः

No Security for Public Transport


Rain water Stagnating on Road
Misuse of Side Walk
सार्वजनिक वाहतुक विश्वसनिय असेल तर कित्येक प्रश्न सुटतील. महापौरांना लिहिलेले पत्र इथे पहा. खासगी वाहने कधीही क्षमतेच्या प्रमाणात वापरली जात नाहीत. प्रवाशांच्या प्रमाणात प्रदूषणाची तुलना केल्यास खाजगी वाहने कितीतरी पटीने जास्त प्रदूषण करतात. प्रदूषण कमी करण्यात सार्वजनिक वाहतुक मदत करते. सार्वजनिक वाहतुकीमुळे रस्त्यांवरील गर्दी कमी करता येईल.

Saturday, 23 April 2011

गणेशोत्सवाचे स्वरुप कसे असावे?



धर्माचा उद्देश समाजामध्ये ऐक्य निर्माण करणे हा आहे. तसेच त्याचे मूलतत्त्व बंधुत्त्व हे आहे. परंतु, काही स्वार्थी लोकांनी लोकांचे लक्ष पूजा-अर्चेकडे वळवून स्वतःकरिता अर्थार्जनाचा सोपा मार्ग शोधून काढला. त्यामुळे सर्वांची समजूत झाली की धर्म म्हणजे पूजा-अर्चा. पूजेचे नियम पाळले की मनुष्य धार्मिक समजला जातो.

Friday, 1 April 2011

कमी उत्पन्न गटातील नागरिकांकरिता सदनिकाः


पुणे-पिपरीचिंचवड सारख्या शहरात कमी उत्पन्न गटातील नागरिकांकरिता सदनिका बांधून दिल्या जातात. पूर्वीच्या बैठ्या चाळीतील नागरिकांना गुंठेवारीप्रमाणे घरे बांधण्यास परवानगी दिली आहे. या सुविधा अत्यावश्यक आहेत. परंतु त्यांचा नगरनियोजनाच्या व पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून विचार केलेला दिसत नाही.

Tuesday, 15 March 2011

चटईक्षेत्र निर्देशांक व नगररचना:

अंकगणिताच्या हिशेबाने चटईक्षेत्र निर्देशांक वाढवल्यास सदनिकांचे भाव कमी होतील हे म्हणणे अगदी बरोबर आहे. परंतु व्यवहारात हे गणित चुकीचे ठरेल. 2 अथवा 3 चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर केल्यास तेवढ्याच जागेवर दुप्पट अथवा तिप्पट सदनिका बांधल्या जातील. सदनिकेच्या किंमतीत सध्या, जागेच्या किंमतीचा भाग मोठा आहे.

मेट्रोला धोपटणे आता थांबवाः

राजकारणी लोकांची मानसिकता वेगळी असते. लोकांच्या गळी आपले म्हणणे उतरविण्याकरिता ते कांहीही करू शकतात. दाभोळ वीज प्रकल्पाचे उदाहरण फार जुने नाही. अरबी समुद्रात प्रकल्प बुडविण्याची भाषा करत तो वाढीव क्षमतेसह त्यांच राजकारण्यांनी मंजूर केला. पीएमपीएलकडे पुरेसा निधी असतानाही काही ना काही मुद्दे उपस्थित करून बस खरेदी लांबवली.

Saturday, 12 March 2011

रहदारीचे नियम तोडणाराना धडा शिकवा!

प्रत्येक समस्येवर उपाय असतोच. समस्या भयंकर तर उपायही तितकेच भयंकर असू शकतात. कांही वर्षापूर्वी वाचले होते की एका मराठी माणसाला आफ्रिकेतील एका देशात रस्ता वाहतुक शिस्त पाहून आश्चर्य वाटले. विचारल्यावर चालकाने जे सांगितले ते ऐकुन त्याचा विश्वासच बसला नाही.

Wednesday, 9 March 2011

नागरिकांचा अर्थसंकल्पात सहभाग:

महानगरपालिकांनी नागरिकांना अर्थसंकल्पात सहभागी करून घेण्याचा चांगला उपक्रम चालू केला आहे. परंतु, नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक नाही. त्याला काही कारणे आहेत. त्यावर उपाययोजना केल्यास नागरिक नक्कीच उत्साह दाखवतील व महानगरपालिकांचा हेतु साध्य होईल. नागरिकांनाही ईप्सित सेवा मिळतील.

Sunday, 6 March 2011

All architecture and engineering of Road for knowledge of common Man

 I had placed this topic under many articles. I am just grouping those articles. Although roads in article are basically for towns and cities many aspects are common for villages, connecting roads and highways. This can be read both in Marathi and English. There may be more information in English articles.

Friday, 17 December 2010

Road Maintenance:


Even after taking all precautions road would need repairs due to other unexpected reasons. Wherever roads are constructed violating engineering norms first rain may make condition so bad that it would be impossible to recognise road. See all about roads here.
Virtually one may have to find road patches among potholes. Such a condition of road shall virtually stop traffic create traffic jams and increase avoidable accidents and unrest among citizens. In order to get over

Popular Posts